बेळगाव : येथील शिवशंभू भक्तांच्यावतीने बलिदान मासची सांगता धर्मवीर संभाजी चौक येथील श्री शिवशंभूतीर्थ स्मारकाच्या ठिकाणी करण्यात आली. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्येपर्यंत शिवशंभू भक्तांनी बलिदान मास म्हणून आचरणात आणला. अनगोळ विभागातील कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास गावातील प्रत्येक गल्लीत मोठ्या गांभीर्याने पाळला. शनिवारी सायंकाळी मारुती मंदिर, रघुनाथपेठ येथून धर्मवीर संभाजी महाराज ज्वालेची मूक पदयात्रा संपूर्ण अनगोळ भागात काढण्यात आली. यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथील शिवशंभूतीर्थ स्मारकाच्या ठिकाणी ही ज्वाला शांत करण्यात आली. संभाजी महाराजांच्या बलिदानाची संपूर्ण हिंदू समाजाला जाणीव रहावी यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला विधिवत मंत्राग्नी दिला. गावातील महिला, युवती-युवक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी भरत कुरणे यांनी धारकरी व शिवशंभू भक्तांना मार्गदर्शन केले.
Previous Articleआठ तासांच्या ड्युटीनंतर आरोग्य यंत्रणा सांभाळणार कोण?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









