स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंनी शिवबांना हाताशी घेऊन पुण्याची पुनर्बांधणी सुरू केली आहे. शहाजी राजांनी पाठवलेली कवडय़ांची माळ मिळवण्यास आपण पात्र आहोत, हे शिवबांनी सिद्ध केलं आणि भोसल्यांचं लेणं असलेली कवडय़ांची माळ अभिमानानं परिधान केली.
दरम्यान शिवबांच्या आयुष्यातल्या महतत्त्वपूर्ण घटना स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शिवबा आणि सईबाई यांचा विवाहसोहळा पार पडला. शिवबा आणि सईबाई यांच्या लग्नाची रंजक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. जिजाऊंनी फलटणचे निंबाळकर यांच्या सईबाईंशी शिवबांचा विवाह ठरवला याला बरीच राजकीय कारणं होती. स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेतलं ते एक महत्त्वाचं पाऊल होतं. शिवबा आणि सईबाईंच्या लग्नाला शहाजीराजे बंगळूरहून पोहोचू शकले नाहीत, तेव्हा जिजाऊंनी एकटय़ांनी शिवबांच्या लग्नाची जबाबदारी लीलया पेलली. ही सोयरीक जुळावी ह्यासाठी जिजाऊ जितक्या प्रयत्नशील होत्या, तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रयत्न ही सोयरीक जुळू नये, ह्यासाठी शत्रू पक्ष करत होता. पण आजपासून साधारण पावणे चारशे वर्षांपूर्वी अमीनसारखा बलाढय़ शत्रू समोर असताना एकटय़ा स्त्राrनं शिवबांचं लग्न व्यवस्थित पार पाडलं होतं आणि हा रोमहर्षक आणि चित्तथरारक इतिहास आता या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मुलखावेगळ्या आईची ही गाथा आता रंजक अशा वळणावर येऊन पोचली आहे. जिजाऊ रयतेचा जाणता राजा घडवत आहेत. स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.









