बेंगळूर : आठवडाभरानंतर शुक्रवारी प्रथमच राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील चोवीस तासांमध्ये 41,779 बाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, संसर्गमुक्त होण्याचे प्रमाण दिलासादायक असून शक्रवारी दिवसभरात 35,879 जण कोरोनामुक्त झाले. तर 373 जण कोरोनामुळे दगावले आहेत. आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार शुक्रवारी राज्यात 1,27,105 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण शुक्रवारी 32.86 टक्के इतके होते. राज्यात आतापर्यंत एकूण 21,30,267 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण 15,10,557 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 21,085 रुग्ण दगावले आहेत. राज्यात सध्या 5,98,605 सक्रिय रुग्ण आहेत. बेंगळूरमध्ये मात्र, संसर्ग कमी होत असून नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण 14 हजारांवर आले आहे.
Previous Articleराज्य सरकारकडून लवकरच कोविड पॅकेज मिळणार
Next Article गृहमंत्र्यांच्या निवासस्थानीच कोविड सेंटर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









