वार्ताहर/ रेवोडा
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आपला देश वेगाने जात असताना चाकोरीबद्ध शिक्षणाची वाट सोडून प्रगतीच्या नवनवीन क्षितिजाना गवसणी घालण्याचा ध्यास युवा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे उद्गार पीर्ण ग्रामस सेवामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काढले.
श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पीर्णच्या वार्षिक बक्षिसवितरण सोहळय़ात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाइतकीच पालकांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे सचिव प्रकाश नाईक, सदस्य शशिकांत नाईक, प्राचार्य उमेश नाईक, श्री शांतादुर्गा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजनिता सावंत व पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडते उपस्थित होते.
प्राचार्य उमेश नाईक यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात मिळविलेल्या उज्जवल यशाचे कौतुक करून ही परंपरा वर्धिष्णू ठेवण्याचे आवाहन मंडळाचे सचिव प्रकाश नाईक यांनी केले. मान्यवरांच्याहस्ते शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळविलेल्या साई नाईक, साईशा शेटय़े, सिंदिया नाईक, तन्वी नाईक, आकांक्षा नाईक, मंजिरी कुबल, दिव्येश परब, अमिषा चोडणकर, गौतमी देसाई, नारायण सावळ, प्रतीक कळंगुटकर, सिद्धी नाईक, अंकूर परब, रेश्मा फडते, प्रणिता शिंदे, नेत्रा लांबार, प्रियांक सावळ, सुकन्या नाईक, सुयानी नाईक, आदर्श कोरगावकर, साईश परब, अंजनी धारगळकर, यश नाईक, महिम नाईक, विनायक नाईक, साहील खलप, बाबली च्यारी, प्राची गावस, शुभम सुतार, अक्षता नाईक, राणी जळगेकर, नेहा नाईक, खुशी कळंगुटकर, सगुण सावळ, रेश्मा फडते या विद्यार्थ्यांना पारितोषिके तसेच प्रमाणपत्र देऊन गोरविण्यात आले.
प्राध्यापक दत्ता परब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्राध्यापक रजनीकांत सावंत तसेच प्राध्यापिका अपूर्वा सावंत यांनी केले. तर प्राध्यापिका गंधाली परब यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी विश्वास नाईक व यशवंत साखळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.









