जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार वितरण कार्यकम
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत करून नावलौकिक मिळवावा. अनेक विद्यार्थी अभ्यास करून काय साध्य होणार असा विचार करत असतात. पण, प्रथमपासून जर आपण चांगली मेहनत घेतली तर नोकरीमध्ये मोठय़ा हुद्यापर्यंत जाऊ शकतो, असे प्रेमानंद गुरव यांनी सांगितले.
बालदिनानिमित्त कै. श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ जायंट्स सखीच्या वतीने सखी बालगौरव पुरस्कार वितरित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षा निता पाटील, डॉ विनोद गायकवाड, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवर, गौरवमूर्तीचे स्वागत ज्योती अनगोळकर यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महिला विद्यालयाची विद्यार्थिंनी अक्षता सांबरेकर आणि मराठी प्राथमिक शाळा नंबर 5 ची विद्यार्थिंनी संस्कृती हुदलीकर याना सन्मानचिन्ह, रोख एक हजार रुपये, शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे डॉ विनोद गायकवाड यांनी सखीच्या या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थिनींना प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार आपण दरवषी देत आहात. असेच कार्य भविष्यात सुरू ठेवावे असे सांगितले. संस्कृती व अक्षता यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप निता पाटील यांनी केला. कार्यक्रमास मोहन कारेकर, मनीषा कारेकर यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन, आभार सेपेटरी शितल पाटील यांनी मानले.









