कणकवलीत डॉ. शोभा नाईक यांचे प्रतिपादन
आवानओल प्रतिष्ठानचा कविवर्य वसंत सावंत उगवाई काव्योत्सव
अनिल साबळे यांना वसंत सावंत, तर नामदेव गवळींना धामणस्कर काव्य पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी / कणकवली:
लिहिलं की लगेच छापलं जावं ही वृत्ती घातक असून ती कवींनी सोडून दिली पाहिजे. कोणताही खरा कवी सामान्य माणसाच्याच बाजूने कायम राहतो. माणसाचं चैतन्य जीवंत ठेवण्याचे काम कवितेतून झालं पाहिजे. आवानओल प्रति÷ान गेली दहा वर्षे अशा सामान्य माणसांच्या बाजूने राहणाऱया कवींना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवून आपलं सामाजिक कर्तव्य पार पाडत आहे. यातून आवानओल प्रतिष्ठानने मराठी साहित्य चळवळीत आपलं स्वतःचं असं योगदान दिलं आहे, असे प्रतिपादन ज्ये÷ कवयित्री, समीक्षक, भाषांतरकार प्रा. डॉ. शोभा नाईक (बेळगाव) यांनी येथे केले.
आवानओल प्रितिष्टानचा दहावा कविवर्य वसंत सावंत स्मृती उगवाई काव्योत्सव शहरातील हॉटेल गोकुळधामच्या युनिक ऍकॅडमी सभागृहात डॉ. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाला. ज्येष्ट नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सीताराम कुडतरकर यांनी उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमात जुन्नर पुणे येथील कवी अनिल साबळे यांना त्यांच्या ‘टाहोरा’ काव्यसंग्रहासाठी कविवर्य वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार, तर मालवणी कवी प्रा. नामदेव गवळी यांना त्यांच्या ‘भातालय’ काव्यसंग्रहासाठी कविवर्य द. भा. धामणस्कर काव्य पुरस्कार डॉ. नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कवयित्री कल्पना मलये यांचा डॉ. नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ज्येष्ट कवी नारायण लाळे, आवानओल प्रितिष्टानचे अध्यक्ष अजय कांडर, कार्यवाह विनायक सापळे, संस्था पदाधिकारी ऍड. विलास परब, अच्युत देसाई, कल्पना मलये, राजेश कदम, मोहन कुंभार, किशोर कदम, सत्यवान साटम आदी उपस्थित होते.
प्रसिद्धीपासून नव्या कवींनी दूर राहवे!
डॉ. नाईक म्हणाल्या, माणसाचं विस्कळीत जगणं योग्य वाटेवर आणण्याचं काम कवी करत असतो. सामान्य माणसाच्या मनातील घुसमटीला मोकळं होण्यासाठीच कवी आपले शब्द खर्च करत राहतो. माणसाचं चैतन्य जीवंत ठेवण्यासाठी कवीला आपल्या शब्दांच्या कसोटीवर उतरावं लागतं. अशी एखादी तरी कविता आयुष्यात प्रत्येक कवीला लिहिता आली पाहिजे. लिहिलं की लगेच छापलं जावं ही वृत्ती कवीने सोडून दिली पाहिजे. सातत्याच्या प्रसिद्धीपासून दूर राहणारा कवी सामान्य माणसाच्या बाजूने असतो. समाजाच्या तीव्र वेदना कवीच्या मनात आस्था धारण करत असतात. मात्र, प्रसिद्धी डोक्मयात असणारा कवी सतत स्वतःभोवती फिरत राहतो. अशा प्रसिद्धीपासून नव्या कवींनी दूर राहायला हवे.
मराठीतील चांगल्या कवींना पुरस्कार!
कुडतकर म्हणाले, आवानओल प्रितिष्टानसारख्या मोठय़ा संस्थेच्या दहाव्या काव्योत्सवाला मला उद्घाटक म्हणून बोलविले हा माझा सन्मान आहे. कविवर्य वसंत सावंत यांच्याशी माझे स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या पत्नी नीलिमा सावंत यांचा मी विद्यार्थी. आवानओल प्रितिष्टानने खूप मोठं साहित्यिक काम केलेले आहे. या प्रितिष्टानमुळे मराठीतील चांगल्या कवींना गेली दहा वर्षे पुरस्कार देऊन गौरविल्यामुळे चांगली गुणवत्ता असणारे कवी जाणकार रसिकांसमोर आले. महाराष्ट्रातल्या दूरदूरच्या भागातील मोठय़ा कवींना इथे बोलावून त्यांच्या कवितांचा आस्वाद इथल्या रसिकांना देण्याचं काम आवानओलने केले आहे.
साहित्य रसिकांचे मोठे पाठबळ!
कांडर म्हणाले, आवानओल प्रतिष्ठानच्या गेल्या दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीत साहित्य रसिकांचे पाठबळ मोठे आहे. कोणतेही काम एकटय़ाने करता येत नाही. माझ्या सहकाऱयांमुळेच आवानओल प्रतिष्ठानने अनेक कार्यक्रम आयोजित केले. दहा वर्षातील आवानओलच्या पुरस्कार निवडीसाठी मराठीतील मान्यवर लेखकांनी सहकार्य केले.
कवी संमेलनाने आली रंगत
पुरस्कार विजेते कवी अनिल साबळे, प्रा. नामदेव गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कार वितरणानंतर कवी नारायण लाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात विविध अनुभवविश्व मांडणाऱया कविता कवींनी सादर केल्या. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार विनायक सापळे यांनी मानले. रत्नागिरी, गोवा तसेच सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण आदी भागातील साहित्य रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.









