चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ सातारा
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला कर्ज पुरवठा केल्याच्या अनुशंगाने सातारा जिल्हा बंकेकडे ईडीने काही माहिती मागितली आहे. ईडीने बॅंकेकडे माहिती मागितल्याने प्रसार माध्यमातून बातम्या आल्या. या दृष्टीने संचालक मंडळ व बॅंकेतर्फे जी वस्तूस्थिती आहे ती मांडत आहे. आरबीआय आणि नाबार्डच्या निकषाप्रमाणे हा कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. जिह्यातील सहकारी कारखाने आणि दोन खासगी कारखान्यांना जिल्हा बॅंक कर्ज पुरवठा करते. या सर्व बॅंकांचा जो कर्ज पुरवठा आहे, तो एकाच धोरणाने केला जातो. जरंडेश्वर कारखान्याबाबत जिल्हा बॅंकेकडून वेगळे धोरण राबविले गेले नाही, अशी माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सुनिल माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, कांचन साळुंखे व इतर सदस्य उपस्थित होते. बॅंकेला नाबार्डकडून उत्कृष्ठ कार्यक्षमतेबद्दल बेस्ट परफॉर्मन्स बँक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
आमदार शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, जिल्हा बॅंकेने जरंडेश्वर कारखान्याला सहभाग कर्ज योजनेअतर्गंत पुणे डीसीसी बॅंकेबरोबर सहभाग कर्ज योजना अतर्गंत करण्यात आलेल्या मुदती कर्जाकरीता रक्कम रूपये 472.85 कोटी मुल्याकंन असलेली मालमत्ता स्थावर रूपये 239.85 कोटी, जंगम रूपये 233 कोटी तारणात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने घेतलेली आहे. खेळते भांडवला करीता सहभाग कर्ज योजनेतर्गंत माल तारण साखर कर्ज रक्कम रूपये 100 कोटी मर्यादा मंजूर असून कारखाने रक्कम रूपये 30.37 कोटीची उचल केली आहे. आज अखेर येणे बाकी 15.37 कोटी इतकी आहे. कारखान्याने 15 कोटीची परत फेड केलेली आहे.
माल तारण कर्ज मर्यादेच्या अनुशंगाने कारखान्याकडील साखर साठा तारणास्त घेण्यात आलेला आहे. कारखान्यास बॅकेमार्फत मंजूर करण्यात आलेली एकून कर्ज मर्यादा रक्कम रूपये 237.60 कोटी असून एकून रूपये 128.45 कोटी वाटप झालेले असून येणे बाकी रक्कम 97.39 कोटी इतकी आहे. करखान्याने रूपये 31.6 कोटीची परतफेड केलेली आहे. कारखान्याला करण्यात आलेल्या कर्जाची व्याजाची नियमित परत फेड होत असून कारखान्याने मुदती कर्जाची आगाऊ परत फेड केलेली आहे. यामुळे जिल्हा बॅकेतील पैसे सुरक्षित आहेत. यामुळे ग्राहकांनी, ठेवीदारांनी चुकीच्या आफवांवर विश्वास ठेवू नये. सातारा जिल्हा बॅक अतिशय सक्षम आहे. कुठलाही चुकीच्या पद्धतीने कर्ज पुरवठा दिला गेला नाही. दिला जाणार नाही. ही मी संचालक मंडळाच्या वतीने मी माझ्या बॅकेच्या हितचितकांना विश्वास देतो.








