बेंगळूर : राज्यात कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने होत आहे. मंगळवारी राज्यात तब्बल 21,794 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान मागील चोवीस तासात 4,571 जण संसर्गमुक्त झाले. तर दिवसभरात 149 जण कोरोनामुळे दगावले आहेत. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मंगळवारी विक्रमी 1,47,488 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्याच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 14.77 टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 11,98,644 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 10,25,821 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 13,646 जणांचा बळी गेला आहे. सध्या उपचारातील रुग्णसंख्या 1,59,158 इतकी आहे.
Previous Articleजेएसडब्ल्यूकडून 44 टन ऑक्सिजन पुरवठय़ास संमती
Next Article तत्काळ प्रवासी बससेवा सुरू करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









