विधान परिषदेमध्ये भाजप बहुमताच्या जवळ पोहोचेल
प्रतिनिधी/कोल्हापूर
बॉलीवूडसाठी मुंबईमध्ये ज्या सुविधा आहेत त्या देशात अन्यत्र नाहीत. त्यामुळे मुंबईमधून बॉलीवूड कोणीही हलवू शकणार नाही. असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. येथील महाराष्ट्र हायस्कूल मध्ये जाऊन त्यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलीवूड उत्तर प्रदेश मध्ये घेऊन जाणार. असे म्हणाले होते. आज त्यांचा मुंबई दौरा आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, वर्षानुवर्षे चित्रपट निर्मिती मुंबईमध्ये होत आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने, कलाकार, कारागीर, स्टुडिओ मुंबईमध्ये विकसित झाले आहेत. ज्या सुविधा बॉलिवूडला आवश्यक आहेत, त्या सर्व मुंबईत उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतून बॉलीवुड कोणीही हलवू शकणार नाही. योगी आदित्यनाथ बॉलीवूडच्या धरतीवर उत्तर प्रदेश मध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय सुरू करू शकतील. त्याचा अभ्यास करण्यासाठी कदाचित ते आले असावेत असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
तर, राज्यातील सर्व विधान परिषद जागा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकतील. विधान परिषदेमध्ये भाजप बहुमताच्या जवळ पोहोचेल. असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









