- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जयस्तंभास अभिवादन
ऑनलाईन टीम / पुणे :
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र ही शौर्याची भूमी आहे. अनेक प्रसंगात येथील नागरिकांनी शौर्य दाखविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सण, उत्सव, महापुरुषाच्या जयंती साजरी करीत असतांना नागरिकांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांततेत कार्यक्रम साजरे केले आहेत. कोरोना विषाणू पासून संरक्षण करीत असतांना आपल्या कुटुंबीयासोबत नागरिकांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभाग व प्रशासनाने नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी गर्दी टाळत घरातूनच या शूरवीरांना अभिवादन करावे, या करीता प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरदर्शन, युट्यूब आणि फेसबुक या समाज माध्यमावर लाईव्ह करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पवार यांनी केले.









