ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील पाच महिन्यातील सर्वात निच्चांकी कोरोना रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. सोमवारी देशात 19 हजार 556 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 301 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 75 हजार 116 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 111 एवढी आहे.
सोमवारी 34,477 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 2 लाख 92 हजार 518 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 96 लाख 36 हजार 487 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 16 कोटी 31 लाख 70 हजार 557 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 72 हजार 228 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.21) करण्यात आल्या.









