तिरुअनंतपुरम / वृत्तसंस्था
केरळमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि भूस्खलन यामुळे मरणाऱयांची संख्या 31 वर पोहोचली आहे. अनेकजण जखमी झाले आहेत तर अनेक बेपत्ता आहेत. शेकडो लोक पूराच्या तडाख्यात सापडले आहेत. सैन्यदले आणि एनडीआरएफ बचत कार्य करत आहेत. केरळमधील पूरग्रस्त भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळातील अनेक जिह्यांमध्ये पावसाची संततधार सुरु असून बहुतांश भागात 20 ते 22 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पावसामुळे निसर्गाच्या कहराला सामोरे जाणाऱया केरळच्या अनेक जिह्यांमध्ये मदत आणि बचावकार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायम जिह्याच्या आसपासच्या भागात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे. तसेच पटनमथीटाच्या खालच्या भागांत आज पूरस्थिती उद्भवण्याची शक्मयता आहे. या भागांत एनडीआरएफची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच या भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
11 जिल्हय़ांमध्ये यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, कोट्टायम, अल्लाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड या 11 जिल्हय़ांमध्ये मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट जारी केला आहे. कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना उधाण आले असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहने वाहून गेली. नदीच्या काठावरही मोठय़ा प्रमाणात झाडे पडली आहेत.
पंतप्रधान-मुख्यमंत्री संवाद
अस्मानी संकटादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी ट्विट करत मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्यांप्रति दुःख व्यक्त केले.









