काकती : ग्रा. पं. कार्यालय बंबरगा येथे काकती रयत संपर्क केंद्राच्यावतीने शेतजमिनीचे माती परीक्षण शिबिर नुकतेच पार पडले. ग्रा. पं. पीडीओ राजू पत्तार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक काकती रयत केंद्राचे कृषी अधिकारी अरुण कापशी यांनी केले. माती परीक्षणावर आधारित खताचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकण्यास मदत होते. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी पिकांची फेरपालट करावी, असे आवाहन साहाय्यक कृषी निर्देशक आर. बी. नायकर यांनी केले. निजलिंगप्पा साखर संस्थेचे संशोधक आर. बी. सुतगुंडी म्हणाले, माती ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. ती सजीव आणि क्रियाशील आहे. त्यामुळेच जमिनीवर सर्व प्रकारच्या वनस्पती, पीक, अन्नधान्य, चारा निर्माण होतो. जमिनीची सुपिकता ओळखण्यासाठी मातीची तपासणी करणे आवश्यक आहे. लाखमोलाची जमीन चिरकाल शाश्वत निरोगी ठेवता येते. अन्नसुरक्षा व सुरक्षित अन्न यांचे संतुलन साधण्यासाठी मातीचे आरोग्य जपून शाश्वत शेती करावी, असे मार्गदर्शन केले. बंबरगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया गावातील शेतकऱयांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सतीश टोपाई यांनी आभार मानले. यावेळी कृषी साहाय्यक के. एस. कब्बूर, निंगोजी कोले, शेतकरीवर्ग उपस्थित होता.
Previous Articleकोल्हापूर : अतिवृष्टीने 55 हजार शेतकऱ्यांना फटका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









