पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा म्हणजे झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका. परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंगाने मालिकेची कथा उलगडताना दिसते.
आता या मालिकेत एक नवीन एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे अभिनेता तेजस बर्वेची. अप्पांनी सईसाठी अजिंक्य आफळे या उपवर मुलाची निवड केली आहे आणि त्या मुलाची व्यक्तिरेखा अभिनेता तेजस बर्वे साकारतो आहे. सईचं प्रेम नचिकेतवर आहे हे कळताच अप्पा लगेचच सईसाठी योग्य मुलगा शोधण्याची लगबग करतात आणि म्हणूनच सईला अजिंक्य पाहायला येणार आहे. आता अजिंक्य येण्याने मालिकेत अजून काय गम्मत येईल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
ख्वाडाफेम भाऊसाहेब शींदेचा ‘लागल याड तुजं’
सिनेसफष्टी नामक या चंदेरी दुनियेचं सर्वांनाच आकर्षण असतं. इथल्या रूपेरी पडद्याच्या माध्यमातून आपली एक झलक जगासमोर यावी यासाठी असंख्य कलाकार आपलं आयुष्य खर्ची घालतात. याकरिता इथल्या वातावरणाला पोषक वाटावं असं एखादं ग्लॅमरस नाव धारण करून आपली कारकिर्द सुरू करतात, पण काही कलाकार मात्र आपल्या नावाचा सार्थ अभिमान बाळगत त्याच नावानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरतात. अशाच कलाकारांपैकी एक असलेला मराठमोळा अभिनेता भाऊसाहेब शिंदे. हाच भाऊसाहेब आता
‘लागलं याड तुझं’ या आगामी मराठी सिनेमात पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार सोहळय़ात बाजी मारून गेलेल्या ‘ख्वाडा’ या मराठी सिनेमात मध्यवर्ता भूमिका साकारल्यानंतर बबन या प्रेमकथेद्वारे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेला भाऊसाहेब शिंदे ‘लागलं याड तुझं’ या आगामी सिनेमात प्रेमाचे नवे रंग उधळताना दिसणार आहे. निर्माते रुपेश पगारे, संजय पगारे आणि अरविंद कदम शकुंतला क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘लागलं याड तुझं’ या सिनेमाची निर्मिती करीत असून जिजाऊ क्रिएशन्सच्या रुपाली पवार आणि वैशाली पवार या सिनेमाची निर्मिती व्यवस्था सांभाळीत आहेत. आकाश कदम हा नवा चेहरा ‘लागलं याड तुझं’च्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. मराठी सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात शुकंतला क्रिएशन्सचं हे पहिलं पाऊल असून, ‘लागलं याड तुझं’ या प्रेमकथेच्या रूपात नाविन्यपूर्ण, रोमांचक आणि संगीतप्रधान सिनेमा रसिकांच्या भेटीला आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. आजवर मराठी सिनेमात कधीही न दाखवण्यात आलेले प्रेमकथेतील दुर्लक्षित पैलू हा सिनेमा रसिकांसमोर उलगडणार असून दर्जेदार निर्मितीमूल्यांनी सुसज्ज ‘लागलं याड तुझं’ सर्वांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होईल असा विश्वास निर्मात्यांकडून व्यक्त केला जात आहे.
नाव बदलल्यानं नशीब बदलत नसतं, तर मेहनत घेतल्यानं नक्कीच बदलू शकतं हा विचार भाऊसाहेब शिंदेनं सर्वांर्थानं सार्थ ठरवला आहे.









