नागरिकांनी महत्त्वाच्या कामांसाठीच कार्यालयात यावे : नागरिकांनी नियम पाळण्याचे आरटीओ मगदूम यांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेत संपूर्ण जनताच होरपळली आहे. अशा परिस्थितीत सरकारी कार्यालयेही अपवाद नाहीत. लॉकडाऊनमुळे आरटीओ कार्यालय पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. मात्र, ऑनलाईन कामकाज सुरू होते. आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने आरटीओ कार्यालयही सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळूनच आपापली कामे करून घ्यावीत, असे आवाहन आरटीओ शिवानंद मगदूम यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या महसुलात वाढ करून देणारे आरटीओ हे महत्त्वाचे कार्यालय असून ते बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मात्र कोरोना काळात सरकारी कार्यालयांमध्ये अधिक गर्दी होते असते. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्मयता असते. त्यामुळे हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते.
वाहन परवाना काढणे, त्यासाठी अर्ज भरणे, परवान्यासाठी लागणारी फी भरणे, वाहनांची नोंद करणे यासह अनेक कामांसाठी नागरिक या ठिकाणी येत असतात. कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून हे कार्यालय बंद ठेवले होते. मात्र, ऑनलाईन कामे करून देण्यात येत होती. आता पुन्हा हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कोरोना काळात जी महत्त्वाची कामे आहेत तीच कामे करा, असा आदेशही जिल्हाधिकाऱयांनी दिला होता. कार्यालय बंद करण्यात आले तरी ऑनलाईन कामे करण्यात येत होती.
लॉकडाऊन काळात आरटीओ कार्यालय जनतेला समस्या निर्माण होऊ नये यासाठी सुरू ठेवण्यात आले होते. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याने जनतेमध्ये अजूनही सोशल डिस्टन्सबाबत जनजागृती करूनही नागरिक ऐकत नाहीत. त्यामुळे खुद्द आरटीओ शिवानंद मगदूम यांनी कार्यालयाबाहेर पडून वारंवार रांगेत उभे राहिलेल्या व्यक्तींना सोशल डिस्टन्स पाळण्याची सूचना केल्या. आताही तशीच परिस्थिती होत आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून कामे करून घेण्याचे आवाहन आरटीओ मगदूम यांनी केले आहे.









