रत्नागिरी :
कर्करोग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून एचपीव्हीची लस जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांना देण्याबाबत तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करावीत, त्यासाठी आठ दिवसात ऊपरेषा तयार करा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. समिधा गोरे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करताना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची मदत घेता येईल. 9 ते 14 वयोगटातील विद्यार्थिनींसाठी लसचे दोन डोस आणि 15 वर्षावरील मुली व महिलांसाठी 3 डोस दिले जाणार आहेत.
नगर परिषदेने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी डायलिसीस युनिट सुऊ करण्यासंदर्भात सुस्थितीतील गाळे उपलब्ध कऊन द्यावेत. तसेच त्यांना आवश्यक असणारी पाण्याची सुविधा द्यावी. जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी चांगली ऊग्णवाहिका उपलब्ध कऊन द्यावी, असे सामंत म्हणाले.
ठाणे महानगर पालिकेच्या धर्तीवर जिह्यासाठी मॅमोग्राफी व्हॅन खरेदी करावी त्यासाठीचा प्रस्ताव तयार करा, अशी सूचना सामंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिऊध्द आठल्ये यांना केली. मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉ. गोरे यांनी याबाबत प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर सिंधुरत्न योजनेमधून आरोग्यासाठीही मदत मिळण्यासाठी शासनाकडे शिफारस करावी, असे सामंत यांनी सुचवले.








