रत्नागिरी :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. मात्र यापुढील निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील. पार्लमेंटरी बोर्डात जे निर्णय घेतले जातात, ते महायुतीच्या नेत्यांना मान्य असतात. त्यामुळे आचारसंहितेनंतरच यावर वरिष्ठ विचार करतील, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मांडली.
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या आमदार रवींद्र चव्हाण यांनी गुरूवारी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात भेट दिली. येथे पदाधिकाऱ्यांशी पक्षसंघटनाबाबत महत्वपूर्ण चर्चा केली. त्यानंतर माळनाका येथील शासकीय विश्रामगृहात भाजपच्या रत्नागिरी दक्षिण आणि रत्नागिरी उत्तरच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आदी उपस्थित होते. या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भाजपकडून देशभर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी संघटन पर्व कार्यक्रम सुऊ आहे. राज्यात 80 संघटनात्मक जिह्यांची रचना करण्यात आली आहे. 1,214 मंडले तयार करण्याचे काम सुऊ आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांवर प्राथमिक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली जात आहे. विविध उपक्रमांची माहिती त्या-त्या वेळी वरिष्ठ पातळीवऊन घेण्यात येत आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामाचे मूल्यमापन वरिष्ठ पातळीवऊन सुऊ असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 25 जूनपर्यंत महत्वाच्या नेमणुका कऊन मंडल रचना पूर्ण करण्याची प्रक्रिया होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बांधणी सुऊ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळत असते, असे त्यांनी सांगितले. आतापासून निवडणुकीचा विचार करण्याऐवजी पक्ष संघटना वाढीवर आम्ही भर दिला आहे. प्रत्येक पक्षाला संघटना वाढीचा अधिकार आहे. त्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. मात्र पक्ष वाढवताना महायुतीत वाद होऊ नयेत, ही आपली भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर तोडगा काढत असतात, असेही चव्हाण यांनी सांगितले.
- जिल्ह्यात महायुती म्हणून चांगले काम
मागील काही महिन्यात महायुती म्हणून चांगले काम जिल्ह्dयात सुऊ आहे. महायुतीच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी त्यामुळे पूर्ण झाली आहे. नवीन निर्णयांचे नागरिकांनी स्वागत केले पाहिजे, असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.








