जांबोटी : तोराळी गावच्या शेतवडीमध्ये रानडुक्करांनी धुडगूस घातला असून त्यांच्याकडून रताळी व ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनले आहेत. तोराळी देवाचीहट्टी परिसरात गेल्या आठ दिवसापासून जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यांच्याकडून शेतवडीतील रताळी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तोराळी येथील शेतकरी बाबू रामचंद्र गावडा-पाटील यांनी तोराळी गावालगत असलेल्या तीन एकर जमिनीमध्ये गेल्या मे महिन्यामध्ये उन्हाळी रताळी पिकाची लागवड केली आहे. सध्या रताळी कंदाचे जमिनीमध्ये फळधारणा होण्यास प्रारंभ झाली आहे. मात्र गेल्या चार दिवसापासून बाबू रामचंद्र गावडा-पाटील यांच्या शेतवडीमध्ये रानडुकरांच्या कळपाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून जमिनीमध्ये नुकताच रीघलेली रताळी फस्त करीत करीत आहेत. सदर रताळी नागपंचमीनंतर काढणीला येणार होती. मात्र त्या आधीच रानडुकरांनी रात्रीच्या वेळी रताळी फस्त करण्याचा सपाटा चालविल्यामुळे त्यांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. जांबोटी परिसरात रानडुकरे, गविरेडे, माकडे आदी जंगली प्राण्यांकडून ऊस, भात, रताळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. वनखात्याने जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
Previous Articleसंचमान्यता रद्दसाठी धडक मोर्चा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









