बेळगाव : शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहे. शनिवार खुट जवळील एका गटारीमध्येच कचरा टाकण्यात येत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात गटारींमध्ये कचरा अडकून पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे महापालिकेने गटारीत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. ब्लॅकस्पाट हटविण्यासाठी महापालिकेकडून मोहीम राबविली जात आहे. विशेषत: ज्या ठिकाणी गर्दी अथवा रहदारी होते. अशा ठिकाणच्या कचऱ्याकुंड्या हटविण्यात आल्या. तसेच गटारींमध्ये कचरा अडकू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु काही नागरिक गटारींमध्ये कचरा टाकत असून त्यामुळे सीसीटीव्हीही बसविण्यात आले आहे. तरीही कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. शनिवार खुट परिसरात अनेक आस्थापणे तसेच कार्यालय असल्याने हा सर्व कचरा गटारी शेजारी टाकला जात आहे. परंतु वारा तसेच मोकाट जनावरांमुळे हा कचरा गटारींमध्ये जात आहे. त्यामुळे परिसरातील दुकानदारांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हॉटेल्स तसेच फुडस्टॉल दुर्गंधीमुळे चालविणे कठीण झाले असून हा कचरा स्वच्छ करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
Previous Articleभीमगड सफारी प्रकल्प रद्द करा
Next Article रुग्णांच्या हितासाठी कृती आराखडा तयार करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









