पणजी : कदंब महामंडळाच्या धावणाऱ्या बसेस ह्या फायद्यात असूनही सरकार आणखी बसेस खरेदी करण्याचा विचार करीत आहे. वास्तविक त्याची काहीही गरज नसताना हा घाट रचला जात आहे. जर खरेच कदंब महामंडळाच्या बसेस तोट्यात असतील तर सरकारने खासगी बस मालक संघटनेच्या ताब्यात ह्या बसेस द्यावेत, आम्ही त्या फायद्यात आणून दाखवू असे खासगी बस मालक संघटनेचे सचिव सुदिप ताह्मणकर यांनी सांगितले. पणजीतील आझाद मैदानावर काल (बुधवारी) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ताह्मणकर बोलत होते. ते म्हणाले, खासगी बस मालक संघटना ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरळीत सेवा देत आहे. तरीही आमच्या मागण्यांकडे सरकार वारंवार दुर्लक्ष करीत आले आहे. कदंब महामंडळाच्या ताब्यात असलेली अनेक दुकाने भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. त्यामुळे महामंडळ तोट्यात असूच शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.
Previous Article’जल’स्रोत खात्यात अभियंत्यांचा ’दुष्काळ’ आहे का?
Next Article वाहतूक देखरेख अत्याधुनिक करणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









