बेळगाव : एकीकडे वाढत्या उष्म्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. तर दुसरीकडे शहरातील जलवाहिनींना गळती लागली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. गोवावेसपासून शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर सोमवारी जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जाण्याचा प्रकार घडला. शहरात सातत्याने काही ना काही कारणाने पाणी वाया जात आहे. कधी जलवाहिनी तर कधी व्हॉल्व नादुरुस्त होऊन पाणी वाया जाऊ लागले आहे. त्यामुळे एलअॅण्डटीच्या भोंगळ कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे शहराची चिंता वाढली आहे. त्यातच शहरात जलवाहिनींना गळती लागून पाणी वाया जात असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Previous Articleसिंधुदुर्गातील सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावचे वर्चस्व
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









