बेळगाव : तालुका पंचायत कार्यालय हे तालुक्यातील नागरिकांसाठी एक मुख्य कार्यालय म्हणून पाहिले जाते. मात्र हे कार्यालय या ना त्या कारणाने सदैव चर्चेत असते. सध्या या कार्यालयाच्या समोरच पाणी गळती सुरू आहे. ही गळती मागील वर्षभरापासून सुरू असून तालुका पंचायत व या ठिकाणांहून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ही गळती तातडीने काढावी, अशी मागणी होत आहे. मागील वर्षभरापासून हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. परिणामी हे साऱ्यांनाच दिसत असले तरी गळती काढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बेळगाव तालुका पंचायत समोरील वाहने पार्किंग करण्याच्या ठिकाणी गळती लागून परिसरात हे पाणी पसरत आहे. त्यामुळे वाहने पार्किंग करणेही अवघड बनत असून काहीजण तर ज्या ठिकाणी पाणी गळती आहे त्या ठिकाणीच वाहने पार्किंग करतात. ही गळती काढण्यासाठी वर्ष झाले तरी अधिकारी व संबंधितांना याची माहिती देण्यात आली नाही. यावर्षी पाण्यासाठी नागरिकांना मोठ्याप्रमाणात भटकंती करावी लागली. मात्र आता याचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठी मोठ्याप्रमाणात प्रयत्न होत असतानाच सरकारी कार्यालयासमोरील गळती निवारण्यासाठी अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरतोय. त्यामुळे अशा गळती काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ओव्हरब्रिजसमोरच गळती लागली आहे. मात्र ती दुरुस्ती करण्याकडे स्वत: जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तर तालुका पंचायत कार्यालयासमोरही गळती लागली असून ती दुरुस्त करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे.
Previous Articleलम्पीला रोखण्यासाठी प्रतिबंधक मोहीम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









