बेळगाव : इंडाल फॅक्टरीजवळील कुंभार तलाव परिसरात नागरिकांकडून केरकचरा टाकला जात आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांना समज देण्यासह त्या ठिकाणी महापालिकेने सूचना फलक बसवावा, त्याचबरोबर स्मशानभूमीत पाण्याची सोय करून द्यावी, अर्धवट स्थितीत असलेल्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी कणबर्गी ग्रामस्थांतून केली जात आहे. कणबर्गी गावाजवळील इंडाल फॅक्टरी रोडवर कुंभार तलाव आहे. त्या ठिकाणी नवीन लोकवस्ती देखील झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र, काही जणांकडून टाकाऊ पदार्थ व केरकचरा तलाव परिसरात टाकला जात आहे. त्यामुळे सर्वत्र गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांना महापालिकेने समज देण्यासह त्या ठिकाणी सूचना फलक उभारावेत, अशी मागणी केली जात आहे. तसेच स्मशानभूमीत पाण्याची सोय नसल्याने गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन पाण्याची सोय करून देण्यासह अर्धवट स्थितीत असलेले संरक्षण भिंतीचे कामही पूर्ण करण्यात यावे, नजीकच हायस्कूल आहे त्यामुळे त्याचा त्रास विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. या सर्व प्रश्नांकडे महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधित समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Previous Articleतालुक्याच्या पश्चिम भागात चौथ्यांदा रोप लागवड
Next Article अतिवाड अप्रोच रोडची अक्षरश: दुर्दशा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









