बेळगाव : खादरवाडी येथील रस्त्याचे काम अपूर्ण असून, त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रेशन यांच्या नावे ग्रामस्थांनी गुऊवारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. खादरवाडीतील 1.80 मीटर मुख्य रस्त्याचे काम 10 जानेवारी रोजी सुरू करण्यात आले. काही भागाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. उर्वरित भागाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलेच नाही. या रस्त्यावरून वाहनांची नेहमी वर्दळ असते. उर्वरित रस्त्याचे काम येत्या 7 दिवसांत पूर्ण करण्याची सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना करावी. मागील तीन वर्षांत गावामध्ये केणतीही विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
Previous Articleहिडकलचे पाणी वळविणारा प्रकल्प तात्काळ थांबवा
Next Article खासबाग निराश्रीत केंद्राला मनपा आयुक्तांची भेट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









