वाळपई : पंढरपूर आषाढी यात्रा एकादशीचा सोहळा आज गुऊवारी साजरा होत आहे. यानिमित्त सत्तरीतून 500 पेक्षा जास्त वारकरी श्री विठ्ठालाच्या दर्शनासाठी पायी वारीने प्रस्थान केलेले वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. त्यांनी 13 दिवस पायी प्रवास केला. गुऊवारी पार पडणारा श्रींच्या दर्शनाचा अनोखा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी सज्ज झाले आहेत. सत्तरी तालुक्यातून एकाचवेळी चार दिंड्या पंढरपुरात गेल्या आहे. दरम्यान, सत्तरी वारकरी मंडळाचे सोमनाथ गावस यांनी 13 दिवसांची पायी वारी अत्यंत आनंदात संपन्न झाल्याचे सांगितले उस्ते येथील दिंडीतील वारकरी भानुदास पवार यांनी दिंडीमध्ये सहभागी होण्याचा अनुभव प्रत्येकाला वेगळ्या प्रकारचा असतो असे यावेळी त्यांनी सांगितले. पांडुरंग गावकर यांनीही वारीचा तसेच आज श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाचा आनंद अनुभवणार असल्याचे सांगितले.
Previous Articleबेती विठोबा रखुमाई मंदिरात आज आषाढी एकादशी
Next Article अबकारी घोटाळा प्रकरण पोलिसांकडे द्या : भंडारी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









