बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून घटना बदली करण्याचा हिडन अजेंडा आहे. याद्वारे देशामध्ये मनस्मृती आणण्याची तयारी करण्यात आली आहे, असे डॉ. बी. आर. आंबेडकर दलित संघटनेचे राज्य समिती संस्थापक अध्यक्ष श्रीधर कलिवीर यांनी सांगितले. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चिकोडी लोकसभेच्या काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. लोकसभा समितीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील रक्षी क्रॉस येथे एका खासगी हॉटेलमध्ये विविध दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले. भाजप सरकारकडून घटनेतील आशय बदलण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे देशामध्ये अराजकत्ता माजण्याची शक्यता आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून दलितांवर अत्याचार, अन्याय, खून, दरोडे वाढले आहेत. भाजप आणि संघ परिवाराकडून लोकशाही विरोधात भूमिका घेतली आहे. जातीवादाला प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे देशद्रोही गोडसे, सावरकर यांचे विचार पुढे आणले जात आहेत. असा आरोपही त्यांनी केला. अनुसूचित जाती-जमाती, अन्याय निवारण जिल्हा माजी सदस्य सुरेश तळवार एम. गोविंदराज, एम. गुरूमूर्ती, भीम आर्मीचे अध्यक्ष डी. एस. राजगोपाल, मल्लेश चौगुले, सिद्धाप्पा कांबळे, आप्पासाहेब नायक, श्रीकांत तळवार, दुर्गेश मेत्री, माधव तळवार, बी. के. सदाशिव, आण्णाप्पा खातेदार, कुमार तळवार आदी उपस्थित होते.
Previous Articleजगदीश शेट्टरना भरघोस मतांनी निवडून द्या
Next Article केएलईच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









