बेळगाव : मंगळवारी झालेल्या वळीव पावसामुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेटच्या आतमध्ये घातलेल्या पेव्हर्सवर पाणी तुंबल्याने महानगरपालिकेत ये-जा करणाऱ्या नागरिकांसह अधिकाऱ्यांना पाण्यातूनच वाट काढावी लागली. वळीव पावसात अशी परिस्थिती झाली तर पावसाळ्यात काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मनपाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गार्डनसमोर पेव्हर्स घालून त्याठिकाणी वाहने पार्किंगसाठी जागा खुली ठेवली आहे. मात्र पेव्हर्स अशास्त्रीय पद्धतीने बसविल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी तुंबून रहात आहे. अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम असली तरी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. मंगळवारी झालेल्या वळीव पावसामुळे पुन्हा तेथे तळ्याचे स्वरूप निर्माण झाल्याने पावसाळ्यापूर्वी पेव्हर्स व्यवस्थितरित्या बसविण्याची मागणी केली जात आहे.
Next Article शहरात ऐन उन्हाळ्यात पाणी वाया
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









