गोंडा : केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते कीर्तिवर्धन सिंह यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. गेंडाचे खासदार आणि केंद्रीय विदेश राज्यमंत्री असलेले सिंह हे मनकापूर राजघराण्याचे प्रमुख देखील आहेत. त्यांच्या विरोधात एका इसमाने जमिनीवर कब्जा करणे, धमकी देण्याची तक्रार नोंदविली आहे. मंत्री कीर्तिवर्धन सिंह समवेत 5 जणांची नावे या एफआयआरमध्ये सामील आहेत. एमपी-एमलएलए न्यायालयाने केंद्रीय मंत्री कीर्तिवर्धन सिंह आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला आहे. एका जमिनीवर बनावट दस्तऐवजांद्वारे कब्जा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अजय सिंह यांच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली आहे. केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून जमिनीची बनावट दस्तऐवजांद्वारे विक्री केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा याचिकाकर्ते अजय सिंह यांनी केला आहे.
Previous Articleभटक्या श्वानांसंबंधी आज सुनावणी
Next Article चीनचे विदेश मंत्री भारतात येणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









