Uday Samant on Sanjay Raut : निवडणुकीच बिगुल वाजल्याची अनेकांना जाणीव झालीय. विरोधकांकडे भरपूर वेळ आहे असाच निवांत वेळ त्यांना पुढचे वीस-पंचवीस वर्षे मिळो, अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करेन. त्यांना दुसरं काहीही काम नाही रोजच ते बोलत असतात रोजच त्यांचा इव्हेंट चालू असतो,अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. आज ते कोल्हापुरात बोलत होते.आमच्या नेत्यांबद्दल नाराजी सांगणारी जी सूत्र आहेत त्यांचीच एसआयटी चौकशी लागली पाहिजे असेही ते म्हणाले.
महविकास आघाडी संदर्भात बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सध्या जे काही राजकारण चालू आहे त्यानुसार नेत्यांना स्वबळावर लढण्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांची जरी भेट झाली असली तरी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल ही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, इंडिया आघाडीची बैठक घेऊन फार मोठं काही साध्य होईल असं मला वाटत नाही.भारत देशाबद्दल खरा अभिमान कोणाला आहे हे या देशातल्या जनतेला माहिती आहे. 370 काश्मीर मधलं कलम बघितलं, राम मंदिर कोणी बांधलेला आहे ते जनतेनं पाहिलं आहे. भारताबद्दल खरा अभिमान हा नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाच आहे.भरत शेठ असे अनेक किस्से सांगतात ते माझे जवळचे मित्र आहेत.भरत शेठ यांनी जे काही बोलले ते त्यांच्या भाषणाची शैली आहे ते कोणावरही नाराज नाहीत.भरत शेठ गोगावले यांनी कोणालाही दुखावण्यासारखं वक्तव्य केलेलं नाही खासदारकीच्या आणि आमदारकीच्या जागांबाबत तीन नेते मंडळी बसून फॉर्मुला ठरवतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
कर्नाटकमध्ये आता काँग्रेसच सरकार आहे. ज्यावेळी कर्नाटकात भाजपचे सरकार होतं त्यावेळी हेच काँग्रेसवाले आम्हाला शिकवत होते. महाराष्ट्रात आमची सत्ता आली त्यावेळी मात्र सीमा भागातील पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न यावर एकनाथ शिंदेने काम केलेले आहे हे सीमा वासियांसोबत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर राखणं हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर अखंड देशाची जबाबदारी आहे. शिवरायांच्या बाबतीत जर असं कोणी काही करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो असेही ते म्हणाले.








