पणजी : पणजी व चिंबल येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात दोघे ठार झाले आहेत. किनारा बार, चिंबल येथे स्कूटर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात स्कूटरचालक ठार झाला, तर मांडवी पुलावर झालेल्या स्वयं अपघातात स्कूटरवर मागे बसलेल्या इसमाचा मृत्यू झाला आहे. चिंबल येथील अपघातात रिक्षाचालक व्यंकटेश तिऊपती जाधव (वय 29 वर्षे, सांताक्रूझ) याने भरधाव वेगाने रिक्षा चालवून विरूद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटरला धडक दिली. स्कूटरचालक अजय प्रकाश कांबळी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता. त्याला उपचारासाठी इस्पितळात न नेता तो पळून गेला. दरम्यान, लोकांनी जखमीला गोमेकॉत नेण्यासाठी प्रयत्न केला परंतु वाटेतच स्कूटरचालक अजय प्रकाश कांबळी (30 इंदिरानगर-चिंबल) याचा मृत्यू झाला रिक्षाचालक व्यंकटेश तिऊपती जाधव याच्या बेजबाबदारपणामुळे अपघात झाला. असल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. ओल्ड गोवा पोलिसांनी रिक्षाचालकाच्या विरोधात भादंसंच्या 279, 304 ए, तसेच वाहन कायदा (ए) (बी) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. bदुसरा अपघात मांडवीच्या नव्या पुलावर झाला. म्हापसा येथून रायबंदरला जाणारी स्कूटर पुलावर उलटली. चालक कमल सिंग चंद्रावत आणि मागे बसलेला ब्रिजमोहन यादव हे दोघेही जखमी झाले. चालक कमल सिंग याने हेल्मेट घातलेला असल्यामुळे त्याला किरकोळ जखम झाली. त्यामुळे तो बचावला, तर मागे बसलेला ब्रिजमोहन याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. चालकाविऊद्ध पणजी पोलिसांनी भादंसंच्या 279, 337, 304 ए कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
Previous Articleवाडे वास्कोतील तळ्यात मगरीचे वास्तव
Next Article खासदार डॉ. अमोल कोल्हे बॅक टू पॅव्हेलियन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









