बेळगाव : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शेतकरी संघटनांकडून काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्यावर रास्ता रोको करून आंदोलन केल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. यामुळे चन्नम्मा चौकातून होणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करावा लागला. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान शेतकरी संघटनांनी रस्त्यावर येवून आंदोलन केल्याने वाहतूक मार्गात बदल करणे भाग पडले. आरटीओ सर्कलकडून चन्नम्मा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इतर मार्गाने वळविण्यात आले. तर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रणरणत्या उन्हात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनधारकांची चांगलीच फजिती उडाली. पोलिसांनाही वाहतुकीला मार्ग करून देण्यासाठी कसरत करावी लागली.
Previous Articleपिरनवाडी येथे शिवाजी महाराज चौकात अवजड वाहनाची कारला धडक
Next Article म. फुले रोडवर चेंबर खचल्याने अपघातांच्या घटना
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









