बेळगाव : महिला आणि मानवी तस्करी रोखण्यासाठी शनिवार दि. 14 रोजी बेळगावमध्ये जागृती फेरी काढली जाणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून मूक फेरी काढून मानवी तस्करीला आळा बसावा, असा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती उज्ज्वला महिला रक्षण व पुनर्वसन केंद्राच्या संचालिका सुरेखा पाटील यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महिला व बालकल्याण विभाग, मूव्हमेंट इंडिया व त्रिलेट मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी 8.30 वाजता जागृती फेरी काढली जाणार आहे. सरदार्स हायस्कूल मैदानापासून या फेरीला सुरुवात होणार असून कॉलेज रोडमार्गे चन्नम्मा चौक, काकतीवेस रोड, शनिवार खूट, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक मार्गे सरदार्स हायस्कूल मैदानावर सांगता होणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. बेळगाव जिल्हा महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्यामुळे मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील काही महिन्यांत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. केवळ अशिक्षित नाही तर सुशिक्षित महिलांनाही सोशल मीडियाच्या आधारे जाळ्यात ओढून त्यांना वेश्याव्यवसायासाठी ढकलले जात आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी गावोगावी जाऊन ग्राम पंचायतीच्या माध्यमातून प्रचार केला जात असल्याचे हँड्री चेन्नय्या यांनी सांगितले. यावेळी डॉ. पूजा व इतर सदस्य उपस्थित होते.
Previous Articleमहिला हॉकी संघाला जिल्हाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा
Next Article सौंदर्य वाढविणाऱ्या कुंड्यांची अवस्था दयनीय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









