खानापूर : खानापूर तालुक्यातील हलशी गावातील शेतकरी महादेव निंगाप्पा बावकर यांच्या अवघ्या एका आठवड्यात तीन म्हशींचा टलेरिया आणि इतर कारणामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून म्हशीं आजारी होत्या. रोग बरा करण्यासाठी बावकर यांनी तातडीने प्रयत्न केले. यासाठी त्यांनी खानापूर पशुसंगोपन, बेळगाव तसेच धारवाड येथील पशुवैद्यकीय तज्ञ डॉक्टरांनी उपचार केले. परंतु प्रयत्न व्यर्थ ठरले. सदर म्हशींचा पशुसंगोपन खात्याच्या डॉक्टरानी पंचनामा केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जनावरे हेच प्रमुख आर्थिक उत्पन्नाचे साधन असते. मात्र तीन म्हशी दगावल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून तातडीने बावकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
Previous Article‘जंगम’ बेपत्ता तपास अपर पोलीस अधीक्षकांकडे
Next Article सोमवार पेठ-मंगळवार पेठ मंडळातर्फे व्यसनमुक्ती रॅली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









