भाजपचे नेते प्रवीण दरेकर सदाभाऊ यांच्या भेटीला
सातारा प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने 22 मे पासून कराड ते सातारा यादरम्यान वारी शेतकऱ्यांची ही पदयात्रा काढण्यात येत आहे. आमच्या मागण्यांवर आणि प्रश्नांवर राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास ही वारी मुंबई पर्यंत काढणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला हाेता.
वारीचा आज चौथा दिवस असून सातारा पोलीस प्रशासनाने खाेत यांची पुणे बंगळूर महामार्गावर जाऊन भेट घेत पदयात्रा थांबविण्याची विनंती केली. परंतु खाेत यांनी आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान या माेर्चामुळे महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु हाेती. आज दुपारी सातारा येथे सभा घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती खाेत यांनी माध्यमांना दिली. यातच भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे सदाभाऊ खोत यांच्या भेटीला साताऱ्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मोर्चावर आज तोडगा निघणार असल्याचे चित्र दिसत आहे.









