बेळगाव : बसच्या तुटलेल्या पत्र्याची चर्चा गाजली. फोटो व्हायरल झाले आणि अखेर परिवहन मंडळाला ती बस सेवेतून रद्दबातल करावी लागली. समाजमाध्यमांच्या प्रभावाचा असाही अनुभव मंडळाला आला. एका बसमध्ये मधल्या पॅसेजचा पूर्ण पत्राच फाटला असून त्याचे वृत्त व्हायरल झाले. हा व्हिडिओ पाहतानाच प्रवासी किती धोकादायक परिस्थितीत प्रवास करीत आहेत, याचा अंदाज येत होता. प्रवाशांनी माध्यमांकडे हे फोटो पाठवले असून अशा बसमधून प्रवास करणे म्हणजे जीवाला धोका आहे, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. दिवसभर याची चर्चा सुरू राहिली अन् अखेर मंडळाने ती बस सेवेतून बाजूला केली. राज्य सरकारने गॅरंटी योजनेंतर्गत महिलांसाठी बस प्रवास मोफत केला आहे. त्यामुळे सध्या महिलांनी मनसोक्त प्रवास सुरू केला आहे. परंतु हा प्रवास सुरक्षित होणेही आवश्यक आहे. मुळात बसमध्ये महिला प्रवाशांची गर्दी झाल्यानंतर त्यांच्या बसण्याच्या जागेवरून प्रचंड प्रमाणात वादावादी होत असून हमरीतुमरीचे प्रकार घडत आहेत. त्यातच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे बस अपुऱ्या पडू लागल्या आहेत. याचा ताण परिवहन मंडळावरही आला आहे. सरकारच्या योजना असल्याने मंडळाला त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. तथापि प्रवास धोकादायक ठरू नये याची काळजी मात्र सरकार आणि परिवहन मंडळानेही घ्यायला हवी. कोणत्याही परिस्थितीत सुस्थितीतील बसच प्रवासासाठी देण्याची नितांत गरज प्रवासी व्यक्त करत आहेत. फाटलेल्या पत्र्यामुळे प्रवाशांना मधल्या पॅसेजमध्ये उभे राहणे अशक्य आहे आणि गर्दीमुळे कुठे उभे राहावे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
Previous Articleकॉसमॅक्स, सिटी स्पोर्ट्स, साईराज संघ विजयी
Next Article दिवाळी संपली, मांसाहाराची मागणी वाढली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









