पणजी : उच्च न्यायालयाने व्याघ्र अधिवासासाठी जो उल्लेख केला आहे, तो म्हादई अभयारण्य तसेच वाघाच्या मार्गाच्या परिघात असा उल्लेख केलेला आहे. व्याघ्र परिघात असा उल्लेख केला असल्याने हा मार्ग काणकोण तालुक्यातील खोतीगाव अभयारण्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवा फाऊंडेशनने वाघाचा जो अधिवास परिघ दाखवलेला आहे त्यास उच्च न्यायालयाने दिलेली मान्यता विचारात घेता काणकोणमधील खोतीगावपर्यंत हा व्याघ्र अधिवास ठरतो, आणि त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र जर व्याघ्रअधिवास म्हणून निश्चित केला तर संपूर्ण क्षेत्रात व्याघ्रसंरक्षण क्षेत्र म्हणून जाहीर करावे लागेल वनमंत्री विश्वजित राणे या संपूर्ण प्रकरणी अस्वस्थ झाले असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. गोवा हे पर्यटन राज्य आहे, त्याचबरोबर खोतीगावपर्यंतच्या अभयारण्याचा परिसर पाहता या चारही अभयारण्यांमध्ये मिळून 15,000 कुटुंबांची वस्ती आहे. त्यांचे पुनर्वसन करणे शक्मय आहे का, असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी आपण पूर्णत: जनतेच्या पाठीशी राहून काम करणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार असे सांगितले.
Previous Articleअपयशी नव्हे, कर्तबगार सरकार!
Next Article म्हादईप्रश्नी सरदेसाईंचा सरकारवर निशाणा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









