बेळगाव : शहरामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून रस्त्यावर तळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज मिळत नसल्याने अडचण निर्माण होत आहे. याची दखल घेऊन रिक्षा चालकांकडून छत्रपती धर्मवीर संभाजी चौक येथे साचलेल्या पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असली तरी कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होणे अशक्य होत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरुप प्राप्त होत आहे. अशा परिस्थितीत रस्त्याकडेला थांबलेल्या रिक्षा चालकांनाही याचा त्रास होत असल्याने रिक्षा चालकांच्या पुढाकारातून पाण्याचा निचरा होण्यासाठी कचरा काढून सोय करून देण्यात येत आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी चौक येथे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने रिक्षा चालकांच्या पुढाकारातून स्वच्छता करण्यात आली.
Previous Articleदर्जाहिन रेनकोट प्रकरणाची होणार चौकशी
Next Article उद्यमबाग ब्रह्मनगर येथे मुख्य रस्त्यावर साचले पाणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









