बेळगाव : येथील तहसीलदार कार्यालयासमोरील धोकादायक वृक्ष शनिवारी हटविण्यात आला. हा वृक्ष उंच गेल्यामुळे आजूबाजुच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला होता. वादळी पावसात हा वृक्ष कधी कोसळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे हा वृक्ष हटविण्यात आला. यामुळे रिसालदार गल्लीचा रस्ता काहीकाळ बंद ठेवला होता. तहसीलदार कार्यालयात दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. तसेच बेळगाव वन कार्यालयातही विविध कामासाठी नागरिकांची गर्दी असते. तहसीलदार कार्यालय असले तरी ही जागा मात्र महापालिकेची असल्याने उंच वाढलेले वृक्ष तोडण्याकडे तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे वृक्ष उंच होत गेले. चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच असणारे हे वृक्ष आता आजूबाजूच्या इमारतींसाठी धोकादायक ठरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत शनिवारी महानगरपालिकेच्या सहकार्याने जुनाट वृक्ष हटविण्यात आला. नगरसेवक शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली वृक्ष हटविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. सेकंड सॅटर्डे असल्यामुळे तहसीलदार कार्यालय बंद होते. त्यामुळे वृक्ष तोडणे सहज शक्य झाले.
Previous Articleजिल्ह्यात बहरतोय चंदनाचा सुगंध
Next Article अशोकनगर येथील ब्लॅकस्पॉट हटविला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









