दापोली / मनोज पवार :
तालुक्यातील हर्णै येथील ‘गोवा-भुईकोट’ किल्ल्याचे नव्याने झालेले बांधकाम नुकत्याच झालेल्या पावसात कोसळले होते. हे बांधकाम पावसामुळेच कोसळले असल्याचा स्पष्ट निर्वाळा पुरातत्व विभागाच्या अभियंत्यांच्या पथकाने ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिला. नुकतीच या विभागाच्या वरिष्ठ पथकाने दापोलीतील हर्णै येथे येऊन गोवा किल्ल्याच्या कोसळलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
तालुक्यातील हर्णै येथे असणाऱ्या ‘सुवर्णदुर्ग’ या जलदुर्गाच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेल्या गोवा किल्ल्याची कमालीची दुरवस्था झाली होती. याबाबत ‘तऊण भारत संवाद’ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यानंतर सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागामार्फत हाती घेतले. शिवाय या उन्हाळ्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली. मात्र अनेक दशके हे काम टिकण्याची अपेक्षा असताना जून महिन्यात झालेल्या पावसात केवळ 2 महिन्यात या किल्ल्याचे नव्याने केलेले बांधकाम कोसळले. यामुळे या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. ठेकेदारावर कारवाईची मागणीही करण्यात येऊ लागली.
यानंतर पुरातत्व विभागाच्या रत्नागिरी, मुंबई आणि नागपूर येथील पथकाने या किल्ल्याच्या पडलेल्या बांधकामाची नुकतीच पाहणी केली. या पथकामध्ये पुरातत्व विभागाचे रत्नागिरी येथील अभियंता विशाल भरसट, मुंबई येथील वास्तू विशारद शरयू मोरे व पुरातत्व विभागाचे निवृत्त कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे यांचा समावेश होता. या पथकाने गोवा किल्ल्याची सखोल पाहणी केली.
- चुन्याचे मिश्रण कडक होण्यासाठी लागतो जास्त कालावधी
यावेळी माहिती देताना पुरातत्व विभागाचे निवृत्त कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे म्हणाले, सामान्यपणे जेथे घराचे बांधकाम होते तेथे 2 दगडांना सांधण्यासाठी सिमेंटचा वापर करण्यात येतो. मात्र किल्ल्याच्या बांधकामामध्ये सिमेंटचा वापर करण्यात येत नाही. या किल्ल्याच्या बांधकामामध्ये चुना, रेती, गूळ, बेलफळ, उडीद, जवस तसेच या भागातील साहित्याच्या उपलब्धतेनुसार मिश्रण बनवण्यात येऊन त्याचा वापर करण्यात आला. सिमेंट सामान्यपणे 21 दिवसांमध्ये पाण्याचा योग्य मारा झाल्यास कडक होते. मात्र किल्ल्याच्या बांधकामासाठी बनवण्यात येणारे चुन्याचे मिश्रण कडक होण्यासाठी बराच कालावधी लागतो. तालुक्यातील हर्णैतील गोवा किल्ल्याच्या बांधकामामध्येही चुन्याचे मिश्रण वापरण्यात आले आहे. मात्र यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाला. त्यामुळे या मिश्रणाला एकसंघ होण्यासाठी कमी कालावधी मिळाला. म्हणूनच हे बांधकाम कोसळले असावे.
- बुरुजाच्या पायातील दगडांकडे झाले दुर्लक्ष
केकडे पुढे म्हणाले, किल्ल्याच्या बुऊजांवर मोठे दगड क्रेनच्या सहाय्याने बसवण्यात आले होते. मात्र यावेळी किल्ल्याच्या बुऊजाच्या पायातील दगडांकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे दगड लाटांच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी ठिसूळ झाले आहेत व अनेक ठिकाणी झिजले आहेत. यामुळे या बुऊजाचे बांधकाम कोसळले आहे. भविष्यामध्ये हे काम करताना जेथे दगड ठिसूळ झाले आहेत अथवा जेथे दगडांची झीज झाली आहे तेथे सर्वाधिक लक्ष देऊन आधी ते मजबूत करणे गरजेचे आहे. यानंतरच बुऊजांची कामे करावी लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चुका टाळून नवीन काम करणार
किल्ल्याचे आतापर्यंत जवळपास 30 टक्के जतन दुऊस्ती काम झाले आहे. कोसळलेल्या भागाचे काम आणि उर्वरित काम पावसाळ्यानंतर लवकरात लवकर करण्यात येईल. शिवाय आधी झालेल्या चुका लक्षात घेऊन त्या चुका टाळून नवीन काम करण्यात येईल, अशी माहिती वास्तूविशारद शरयू मोरे यांनी दिली.








