बेळगाव : जलवाहिन्या घालण्यासाठी शहरात सर्वत्र खोदाई केली जात आहे. परंतु या खोदाईमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खोदाई केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात टाकण्यात आलेल्या मातीमध्ये वाहने अडकली जात आहेत. खोदाई करण्यात आलेल्या चरींमध्ये वाहने अडकून ठिकठिकाणी अपघात होत असल्याने वाहन चालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी नार्वेकर गल्ली येथे मालवाहतूक करणारा एक टेम्पो खोदाई करण्यात आलेल्या चरीमध्ये अडकला. तात्पुरत्या स्वरुपात टाकण्यात आलेल्या मातीमध्ये टेम्पो रुतून बसला. यामुळे वाहनचालकाला मनस्ताप सहन करावा लागला. बरेच प्रयत्न करूनदेखील टेम्पो चिखलातून बाहेर येत नसल्याने तो तेथेच अडकून पडला. अशा घटना शहरात अनेक ठिकाणी घडत आहेत. खोदाई केल्यानंतर जलवाहिन्या घातल्या जात आहेत. परंतु त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात लाल माती पसरली जात आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखल होत असून चिखलामध्ये वाहने अडकत आहेत. त्याचा आर्थिक फटका वाहनचालकांना बसत असल्याने एलअँडटी कंपनीने ही समस्या दूर करण्याची मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.
Previous Articleउभ्या ट्रेलरला धडक, दुचाकीस्वार ठार
Next Article चिरेखानी संपर्क रस्त्याची दुर्दशा, नागरिकांचे हाल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









