हैदराबाद : केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजप अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांना गुरुवारी सकाळी पोलिसांनी शमशाबादमध्ये रोखले आहे. शमशाबाद विमानतळावरून ते बटासिंगरमसाठी रवाना झाले होते. बीआरएस सरकारच्या गरीबांसाठीच्या गृह योजनेच्या एका स्थळाची पाहणी करण्यासाठी ते जात होते. तेलंगणाच्या आरआर जिल्ह्यातील बटासिंगरम गावातील निर्मितीस्थळाच्या दौऱ्यापूर्वी भाजप नेत्यांना स्थानबद्ध करणे अत्यंत निंदनीय आहे. हा प्रकार बीआरएसच्या अत्याचारी शासनाला उघड करणारा आहे. विरोधकांचा आवाज दडपणे ही के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारची ओळख ठरली असल्याचे रेड्डी यांनी ट्विट करत म्हटले आहे. बीआरएसच्या रजाकार शासनाच्या विरोधात भाजपला लढण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. तेलंगणातील प्रत्येक बेघराला घर मिळत नाही तोवर आमची लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणा भाजप अध्यक्षांना रोखण्यात आल्यावर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान वादावादी झाली आहे.
Previous Articleसेंथिल बालाजी यांच्या याचिकेवर आज सुनावणी
Next Article इंग्लंडमध्ये ‘वॉकिंग फुटबॉल’ चर्चेत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









