बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण तालुका युवा आघाडीतर्फे आयोजित युवा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवकांनी सीमालढ्याला बळकटी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शिवाजी हावळाण्णाचे यांनी केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. 12 रोजी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा आघाडीतर्फे महात्मा फुले रोड, शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याच्या जागृतीनिमित्त नुकतीच शहापूर विभागात बैठक पार पडली. या बैठकीत युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, 17 जानेवारी रोजी मध्यवर्ती म. ए. समितीने चलो कोल्हापूरचा नारा दिला. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी होईल, यासाठी प्रत्येक विभागवार जागृती करणार असल्याचे सांगितले. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, राजू पाटील, अशोक घगवे, सूरज जाधव, रणजित हावळाण्णाचे, सचिन दळवी, भागोजी पाटील, विनय पाटील, ज्ञानेश चिकोर्डे, गौरव बाबली, ओमकार बैलूरकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleलोककल्पतर्फे कणकुंबी येथे नेत्रचिकित्सा शिबिर
Next Article जिल्ह्यासाठी वितरण झालेल्या अनुदानाचा पूर्ण वापर करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









