बेळगाव : तलाठी आणि महसूल निरीक्षक वेळेत कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अधिकारी कार्यरत असलेल्या ठिकाणापासून नजीकच त्यांनी वास्तव्य करावे. जेणेकरून ते लोकांच्या वेळेत उपलब्ध होतील. अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राष्ट्र समिती पक्षातर्फे सोमवारी (दि. 2) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांची बहुतांश कामे तलाठी आणि महसूल निरीक्षकांच्या अनुपस्थितीमुळे रेंगाळली जात आहेत. ज्या ठिकाणी अधिकारी सेवा बजावतात त्या परिसरातच त्यांनी वास्तव्य करणे जऊरीचे आहे. असा आदेश 20 नोव्हेंबर 2024 रोजी सरकारने जारी केला आहे. मात्र, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. सरकारी कार्यालयात अधिकारी वेळेत उपलब्ध होत नसल्याने लोकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकांच्या कामाच्या वेळेत अधिकारी कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने पैशांसह वेळही वाया जात आहे. त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी पुन्हा अधिकाऱ्यांना आदेश बजावत सूचना करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य सचिव बी. जी. कुंभारसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी 17 रोजी विधानसौधवर मोर्चा
Next Article वाहन चालकांना 5 लाखांचा विमा कवच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









