बेळगाव : शहर आणि जिल्ह्यात गांजा आणि अंमली पदार्थांची रेलचेल मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन बनत चालली असून खून, दरोडे, चोऱ्या, अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा देत भाजप व्यापार आणि व्यवसाय समिती बेळगाव महानगर जिल्हा यांच्यावतीने मंगळवार दि. 3 रोजी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही वर्षापासून बेळगाव शहर आणि जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री वाढली आहे. शेतामध्ये गांज्याची लागवड करून त्याची खुलेआम विक्री केली जात आहे. दिवसेंदिवस अंमली पदार्थांच्या विक्रीत वाढ होत असल्याने तरुण-तरुणी व्यसनाधीन बनत चालली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून खून, चोऱ्या, दरोडे त्याचबरोबर रस्ते अपघातांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होण्यात अंमली पदार्थांचा वाटा अधिक आहे. त्यामुळे तातडीने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून नियंत्रण आणण्यात यावे. अन्यथा राज्यभर आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleराज्य औषध नियंत्रकांवरील कारवाई त्वरित मागे घ्या
Next Article शहापुरात नवीन ड्रेनेज लाईन कामाला चालना
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









