बेळगाव : उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी प्रत्येक विभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक भागात जोरदार प्रचार मोहीम उघडली आहे. रविवारी सायंकाळी काळी आमराई परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. काँग्रेसने अनेक विकासकामे केली आहेत. याचे भान ठेवून काँग्रेसलाच मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रचारफेरीचा शुभारंभ समिउल्ला माडिवाले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संविधान शिल्प युवक मंडळाच्यावतीने राजू सेठ यांचे स्वागत करण्यात आले. प्रचारफेरी दरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. य् ाा समस्या आपल्याला माहीत आहेत. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठीच आपण निवडणूक रिंगणात असल्याचे आसिफ सेठ यांनी सांगितले. डॉ. बी. आर. आंबेडकर यांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून युवकांनी कार्य करणे काळाची गरज आहे. लोकशाहीमार्गाने प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळावेत, याकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला. हे लक्षात ठेवून प्रत्येकाने मतदान करावे, तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेसने प्राधान्य दिले आहे. सर्व समाजातील मुलांना शिक्षण देण्याचे आमचे लक्ष्य आहे. मतदारसंघाचा विकास करण्याचे ध्येयधोरण समोर ठेवले आहे. त्यामुळे काँग्रेसला बहुमोल मत देऊन विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी काळी आमराई परिसरातील मतदारांनी राजू सेठ यांना पाठिंबा दर्शवून मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Previous Articleलक्ष्मी हेब्बाळकर यांना हिंडलगा भागातून पाठिंबा
Next Article म. ए.समितीच्या चळवळीला माता-भगिनींचे पाठबळ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









