बेळगाव : राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी अंतर्गत विजापूर येथे बी एल डी ए एस या कॉलेजच्या वतीने पदवी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या 10 किलोमीटर धावणे क्रॉसकंट्री स्पर्धेत आरपीडी पदवी कॉलेजचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी समर्थ हानगोजी याने उत्तम कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. आता समर्थची निवड मंगळूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी झाली आहे. समर्थ येत्या महिन्यात आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. समर्थ हानगोजी हा ज्योती अॅथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबतर्फे दोन सत्रात सराव करतो, त्याला क्लबचे ज्येष्ठ प्रशिक्षक एल. जी. कोलेकर, अनिल गोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कॉलेजचे प्राचार्य व क्रीडाशिक्षकांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Previous Articleपोटनिवडणुकीत 81.84 टक्के मतदान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









