गोलपाडा : आसामच्या गोलपाडा जिल्ह्याच्या पॅकन या राखीव वनक्षेत्रात गुरुवारी संतप्त जमाव आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांदरम्यान झटापट झाली असून यात कमीतकमी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झटापटीत पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. वनरक्षक आणि पोलिसांवर अतिक्रमण केलेल्या लोकांनी काठ्यांनी हल्ला केला. पॅकन राखीव वनाच्या एका हिस्स्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. यादरम्यान लोकांनी वनरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे. भविष्यात अतिक्रमणाचा कुठलाही प्रयत्न होऊ नये म्हणून वनविभाग खंदक निर्माण करू इच्छित होता, बुधवारी याचे काम शांततेत पार पडले, परंतु गुरुवारी पथक तेथे पोहोचताच लोकांनी दगडफेक करत काठ्यांनी हल्ला केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रत्युत्तरादाखल कारवाईत स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. दगडफेकीत पोलीस आणि वनकर्मचारी जखमी झाले आहेत.
Previous Article२२ वर्षांपासून हटविला नाही मेकअप
Next Article इराकमध्ये मॉलला आग, 61 ठार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









