खानापूर : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या आणि साहाय्यकांची तालुक्याबाहेरील काही पत्रकार येऊन चौकशी करून कारवाई करण्याची भीती दाखवत आहेत. अशा पत्रकारांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन अंगणवाडी कार्यकर्त्या संघटनेच्यावतीने तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना गुरुवारी देण्यात आले. यावेळी तहसीलदारांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत निश्चित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. खानापूर तालुक्यातील अंगणवाड्यांना काही बाहेरील पत्रकार भेट देऊन पाहणी करून कागदपत्राची तपासणी करत आहेत. हजेरी वही, आहार पुरवठा यासह शासकीय नोंदीच्या वह्या तपासात आहेत. या नोंदीत काही चुका आढळल्यास अंगणवाडी कार्यकर्त्याना आणि साहाय्यकांना हे पत्रकार भीती दाखवून कामचुकारपणा करत असल्याचा आरोप ठेवत आहेत. आणि कारवाईची भीती दाखवत आहेत. जर कारवाईपासून सुटका पाहिजे असल्यास आम्हाला भेटा. चर्चा करुन मार्ग काढू, अशी बतावणी करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यकानी या पत्रकाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. याची दखल घेऊन अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार, बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच नंदगड पोलिसांना निवेदन दिले आहे. या निवेदनात पत्रकाराना येऊन तपासणी करण्याचा अधिकार आहे का, असेही विचारणा केली आहे. तसेच या सर्व पत्रकारापासून अंगणवाडी कार्यकर्त्या आणि साहाय्यकाना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
Previous Articleवारकरी सांप्रदाय जगामध्ये सर्वश्रेष्ठ
Next Article महसूल खात्यातील प्रलंबित अर्ज निकालात काढा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









