पणजी : दिल्ली येथील साक्षी हत्या प्रकरण आणि गोव्यातील लव्ह जिहाद प्रकरणी राष्ट्रीय बजरंग दल, गोवा विभागाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमांतून आणि पोलीस महानिरीक्षकांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. साक्षी हत्या प्रकरण आरोपीला कोणतीही दया माया न दाखवता फाशीची शिक्षा देण्याचे विनंती वजा मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अशा प्रकारे निघृण हत्या करण्राया आरोपींना समाजात राहाण्यचा कोणताही अधिकार नाही, तसेच संपूर्ण देशातील लव्ह जिहाद प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून या प्रकणातील आरोपींना योग्य शिक्षा झाली तरच ही प्रकरणे घडवून आणण्राया नराधमांना जरब बसेल, असे निवेदनात म्हटले आहे. मागील दोन महिन्यांपासून गोव्यात लव्ह जिहाद च्या दहापेक्षा अधिक प्रकरणे हाताळली जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आमच्य भगीनी बळी पडत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. जाणून बूजून हिंदू मुलींना टार्गेट बनवले जात आहे. या घटना थोपविण्यासाठी कायदा कणखर बनवणे हा एक पर्याय असून केंद्र आणि राज्य सरकारने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे राष्ट्रीय बजरंग दलाचे गोव विभाग प्रमुख नितीन फळदेसाई यांनी म्हटले आहे.
Previous Articleमाशेलात जलवाहिनीला गळती मोठ्या प्रमाणात पाणी वाया
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









