बेळगाव : अनगोळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे अनगोळची जनता त्रस्त झाली होती. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागण करण्यात येत होती. त्यानुसार बुधवारी अनगोळ परिसरात भटक्या कुत्र्यांना पकडण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या माध्यमातून ही कारवाई सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून श्रीनगर येथे नेवून त्या कुत्र्यांची नसबंदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मध्यंतरी ही मोहीम थंडावली होती. मात्र पुन्हा कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे ही मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी अनगोळ परिसरात कुत्र्यांना पकडण्यात आले आहे. आता इतर ठिकाणीही ही मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. यापूर्वी भटकी कुत्री पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून ही मोहीम थांबविण्यात आली होती. आता पुन्हा या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून शहरातील सर्वच भागातील कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी, अशी मागणी होत आहे.
Previous Articleचिटणीस, भंडारी विजयी, सेंट जॉन्सला दुहेरी मुकुट
Next Article सदाशिवनगर येथील स्मशानभूमीच्या शेडची दुरुस्ती करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









